रोज सकाळी आंघोळ,बाप्पा करून झालं की सर्वात आधी आम्हला भिजवलेले बदाम लागतात.सर्वांना सम समान वाटप होत.
दोन दिवसांपूर्वी रात्री बदाम भिजवायचे विसरून गेलं.दुसऱ्या दिवशी सकाळी मग आदेश निघाला...
"आऊ... बदाम दे ग..."
सुजाता ने सांगून दिल बच्चा आज बदाम नाहीये मी रात्री भिजवायला विसरून गेले.आता उद्या देते किंवा कोरडे बदाम खाते का?
"नको...कोरडे नको...मला भिजवलेले हवेत..."
मग थोडा वेळ शांतता होती...थोडा विचार चालू होता...मग पुढचा आदेश आला...
"आऊ...तू आता इंग्लंड ला जाते का?"
सुजाताला दोन मिनीट हे अस काय बोलते आहे हे काही समजलंच नाही म्हणून मग विचारल..." का...मी कशाला जाऊ इंग्लंड ला...काय आहे तिकडे..."
"अग आऊ...तिकडे आता रात्र आहे...तू तिथे जा रात्रीचे बदाम भिजव अन मग घेऊन परत ये..."🤣🤣🤣😂😂😂
कारण बदाम हे रात्रीच भिजवायचेच असतात...हे असलं तुफानी लॉजिक आहे....🙈😂😂😂
0 Comments:
Post a Comment