29 November 2019

लग्न 😛

Edit Posted by with No comments
दिवाळी दरम्यान लग्न मुहूर्त अन असच बोलणं चालू होत त्या वेळी बोलताना तुळशीच लग्न झालं की मग लग्न होणार अस पर्णवी च्या कानावर पडलं. मग परत सुप्त असलेला हा विषय पुन्हा उफाळून आला,अन मग आम्हाला पुन्हा आपला नेहमीचा प्रश्न पडला...."माझं लग्न कधी होणार?" 😂😂😂

अखेरीस सुजाता ने कंटाळून तिला सांगितल की..."आपल्या कडे तुळशीचं लग्न झालं की मग त्यानंतर मग लगेच तुझ लग्न..." 🤣🤣🤣

त्यामुळे मग माय आमचं वादळ भलतंच खुश झालं.त्या दरम्यान जिजाऊ मालिकेत सुद्धा जिजाऊ माँ साहेबांच्या लग्नाची बोलणी वगैरे सुरू होत ते पाहून मग काय मी घरी गेलो तेव्हा लगेच आदेश आला...

"बाबू....ए....बाबी....मला किनई लग्नात जिजाऊ माँ साहेबांसारख्या 100 साड्या हव्यात....शंभर...समजलं का"

दर एक दोन दिवसांनंतर मग आठवण करून दिली जायची तुळशीचं लग्न झालं की माझं लग्न आहे.

यथावकाश मग आम्ही तुळशीचं लग्न तेव्हा कार्यकर्ते अगदी जोरात होते...गडबडीत पूजेच्या ताटाला धक्का लागला अन सर्व सांडलं ....कोणी बोललं नाही तर आपल चुकलं आहे हे लक्षात आलं होत त्यामुळे एकदम तोंड बारीक झालं होत पण गाडी आली लगेच ट्रॅक वर कारण लग्ना वेळी अंतरपाट धरण्याचा मान मिळाला.

तुळशीचं लग्न झालं त्यानंतर लगेच प्रश्न आला...."आता माझं लग्न केव्हा करणार....ये अरे बाबू...सांग की..."

सारख विचारणं नको म्हणून मग पर्णवी ला समजून सांगितलं तर त्यावर आपलं नेहमीचं उत्तर आलं....

"नकाच करू माझं लग्न....आऊच अन तुझं लग्न झालं...आजी आजोबांचं लग्न झालं...आत्तु मामांच लग्न झालं...सगळे सगळे लग्न करतात... माझं च लग्न कोणी करत नाही...."😂😂🤣🤣🤣

"बाबू अस करणार ना तू....कट्टी तुझ्या शी आता...मी नाही बोलणार "🙊🤣🤣😂😂😂

काय करावं बर बाबाने 😉


28 November 2019

रायगड 😊

Edit Posted by with No comments
रायगड अन हिरकणी ची गोष्ट ऐकल्यापासून पर्णवी ला रायगडावर जायच आहे.अधून मधून आठवलं की लगेच विचारलं जात...

"बाबू...अरे आपल्याला रायगडावर जायचं राहिलं की...."

त्यात मागच्या आठवड्यात हिरकणी पाहून आल्यापासून रायगड अगदी रडारवर आहे.आज सकाळी शाळेत जाताना आमचं बोलणं चालू होत, तर तिला म्हणाल ..

"बच्चा...तुला आस्ते कदम लक्षात आहे ना...आपण रायगड ला गेलो की तुला तिथं म्हणायचं आहे बर का"
(महाराजांची गारद पर्णवी ची तोंडपाठ आहे...ती पाठ कशी झाली हे लिहीन लवकरच)

"हो...आहे की लक्षात माझ्या...मला सगळं आठवत"☺️

"पण तिथं महाराज असणार ना रे...मी कुठं आस्ते कदम म्हणायचं"

अशी मग प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली...मग अस्मादिक आपल्या बौद्धिक आवाक्या प्रमाणे उत्तर देऊ लागले.

बोलता बोलता अचानक मग जरा पॉज घेतला...अन म्हणे..

"अरे पण बाबू...आपण जाणार पण गडाचे दरवाजे बंद झाले तर मग काय रे?"😂😂😂🤣🤣🤣

शिवकालात संध्याकाळी जसे दरवाजे बंद केले जायचे तसंच आता पण होतंय असा तिचा समज होता पण नंतर मग तिला समजावून सांगितलं की आता अस नाहीये.😊😊

हे सांगेपर्यंत तर आमची हिरकणी सारखी कडा उतरायची पण तयारी झाली होती 😂😂😂🤣🤣

 

25 November 2019

हिरकणी 😀

Edit Posted by with No comments
गोष्ट पुराणातील पुढील अध्याय....

रात्री किंवा दुपारी झोपताना आम्हाला गोष्ट ही लागतेच.आजोबा असतील तर मग त्यांच्या अच्चू बच्चू,लाकूडतोड्या वगैरे टिपिकल जुन्या गोष्टी,मी असेल तर मग ट्रेक च्या गोष्टी,किंवा मग आमची कस्टम मेड बेडुकराव,बंटी बिबट्या अशा गोष्टी असतात.(एकदा काही तरी वेगळी गोष्ट...वेगळी गोष्ट ...अस म्हणतं प्रत्येक गोष्टी ला ना चा पाढा...कंटाळून गेलो...अन मग चक्क माझ्या एका एअरपोर्ट प्रोजेक्टच्या डिजाईनचीच गोष्ट सांगितली होती 🙈🙊).थोडक्यात काय तर माणसानुरूप गोष्ट असते.

एके दिवशी रात्री झोपताना रायगड ची गोष्ट सांगत होतो.मला तर जाम झोप येत होती अन आमचं वादळ मात्र अगदी टळटळीत जागं होतं.मी आपलं झोपेच्या आशेने गोष्ट पूर्ण केली.पण लेकरू काही झोपेना.आता रायगडा ची वेगळी गोष्ट सांग असा आदेश आला.म्हणून मग तिला झोपेतच हिरकणी ची गोष्ट सांगायला घेतली,अन इथेच बाबा चा घात झाला.झोपेत मी तिला चुकीची गोष्ट सांगितली,म्हणजे हिरकणी कडा उतरून जाण्याऐवजी कडा चढून वर गेली.दूध विकायला गडावर येण्याऐवजी गडाखाली गेली....सगळं कस उलट. झोपेच्या आशेने गोष्ट संपवली अन सुटलो.पण मग एक दोन दिवसांत परत गोष्ट सांगत होतो तेव्हा सुजाता ने चूक लक्षात आणून दिली.मग ट्यूब पेटली की आपण चुकीची गोष्ट सांगत होतो.मग परत व्यवस्थित गोष्ट सांगितली अन सॉरी बच्चा ते चुकून आधी वेगळं सांगितले अस म्हणून बापुडा तोकडा असा बचावाचा प्रयत्न केला.

पण प्रकरण तिथे संपलं नव्हतं त्यानंतर बाबु तू मला एकदा उलटी गोष्ट सांगितली होती ना...हो की नाही..अस वेळोवेळी डिवचल गेलं.पण काय करणार...घेतलं गप गुमान ऐकून.

आता हिरकणी पिक्चर आला तेव्हा केव्हाच ठरलं होत आपल्याला हा पिक्चर पाहायचा आहे.पण मला अचानक काम आलं त्यामुळे पर्णवी ला ताई सोबत पिक्चरला पाठवलं.पिक्चर पाहून आल्यावर एक दोन दिवस गडबडीत गेले त्यामुळे आमचं त्यावर जास्त काहीच बोलणं झालं नाही.

पर्णवीच नाईट आउट होत त्यादिवशी मग तिला संध्याकाळी ग्राउंड वरून लवकर आणावं लागणार होत म्हणून मी घ्यायला गेलो होतो.येताना गाडीवर आमच्या खास अशा गप्पा सुरू नव्हत्या.तिला शाळेत सोडायच म्हणून मी गडबडीत होतो.तर अचानक आदेश आला....

"बाबू....ऐक ना...गाडी बाजूला घे पटकन...."

"का ग ...काय झालं..."

"घे ना रे बाबू पटकन..."

मला वाटलं हिला काही तरी त्रास होतोय म्हणून पटकन ट्रॅफिक असूनही गाडी बाजूला उभी केली.

अन म्हणलं..." हं...बोल...काय झालं...का थांबायला लावलंस"

तर म्हणे..."काही नाही...तुला हिरकणी ची गोष्ट सांगायची आहे"

"अग...पर्णवी...आपल्याला उशीर होतो...आता रात्री किंवा उद्या निवांत सांग...आता नको..."

"नाही...आत्ताच...ऐक ना रे बाबू...अस करणार ना तू मला"

झालं घेतली विकेट...मी अजून काही बोलेपर्यंत गोष्ट सुरू पण झाली.नशीब माझं की अगदी पटकन संपवली...पण...लगेचच डायलॉग आला..

" बाबू ...तुला माहितये का...हिरकणी कडा चढून नाही रे उतरून तिच्या बाळाला भेटायला आली होती...समजलं का"

भर रहदारीच्या रस्त्यावर बाजूला उभे राहून गोष्ट ऐकणारे बाप लेक ...अस कधी असतंय व्हय...अन ते पण का तर बाबाचं चुकलं होत याची आठवण करून द्यायला 😂😂🤣🤣🤣

पण..मी काय म्हणतो...चुकतो माणूस...झाली जरा गडबड..तर अस करायचं का बाबाला 😛😉🤣🤣


23 November 2019

नाथ 😛😛

Edit Posted by with No comments
पर्णवी ला सुरुवाती पासूनच गोष्टी ऐकायला फार आवडतात.आम्ही गाडीवर जात असतो तेव्हा सुद्धा लहर येईल त्याप्रमाणे गोष्ट सुरू होते.

थोडं समजायला लागलं तस आता गोष्ट ऐकून झाली की मग त्या गोष्टीच लगेच नाट्य रुपांतर होतं.मग गोष्टी मधील मुख्य भूमिका अर्थातच तिच्या कडे असते मग त्याखाली 2 दोन। नंबर ची भूमिका आऊ कडे अन उरलं सुरलं सडेफटींग कामाला नेहमी प्रमाणे बाबा असतोच.

म्हणजे...जेव्हा कॅप्टन अभिनंदन यांना पाकिस्तान ने पकडलं होतं अन त्यानंतर काही तास ते जे काही नाट्य झालं ते गोष्टी रुपात पर्णवी ला सांगितलं तेव्हा त्यांनतर कित्येक दिवस आमच्या घरात रोजच बालाकोट व्हायचा.त्यात अर्थातच कॅप्टन अभिनंदन म्हणजे पर्णवी,सुजाता इंडियन आर्मी अन मी म्हणजे पाकिस्तान. मग आमच्या विमानांचा  हल्ला व्हायचा मग मी पर्णवीला पकडून न्यायचं...अन मग सुजाता ने  तिला सोडवायच...हे अस असायचं...किंवा मग शाहिस्तेखान ची गोष्ट असेल तर मग माझी कित्येक वेळा बोट छाटली जायची....तान्हाजी मालुसरेंची गोष्ट असेल तर मी उदयभानू अन ती तान्हाजी.....अन हे सर्व तिला हवं तस डायलॉग मध्ये बोलायचं....जरा चुकलं की लगेच अरे काय बाबूं...जाऊ दे तू असंच करतो...मला करायची गोष्ट अस म्हणून स्वतःच रुसायचं एकंदरीत गोष्ट प्रकरण किती कठीण आहे हे लक्षात आलंच असेल.

काही दिवसांपूर्वी सुजाता ने दुपारी तिला सीता हरण ची गोष्ट सांगितली....मग काय संध्याकाळी घरी आल्यावर लगेच फर्मान आलं...बाबू आज आपल्याला सीता हरण करायचं आहे...मला काही झेपलं नाही....हे बहुतेक पर्णवी ला समजलं असावं...त्यामुळे मी पुढचा प्रश्न विचारण्या अगोदरच कमेरवर हात ठेवून दुसऱ्या ने हात वारे करत सांगू लागली....अरे सीता माईंना नाही का रावण पळवून नेतो ती वाली गोष्ट....समजलं का....आता ऐक...तू मारीच राक्षस अन रावण...मी सीता अन अन आऊ श्रीराम बाप्पा....ठीक आहे...

मी आपलं मान डोलवली...हो ठीक आहे...पाचेक मिनिटात आमचं नाटक सुरू झालं...जस रावणाने सीतेला पकडलं तस सीता मातेचा प्रभू श्रीराम यांचा धावा सुरू झाला....अन लगेच काही तरी तिला आठवलं म्हणून ऐका ना ...थांबा ...थांबा....अस म्हणत आम्हाला थांबण्याचा आदेश आला..

मी म्हणलं..."का ग....काय झालं?"

तर तोंडाचा चंबू करत सुजाताला म्हणे..."आऊ..तू बबुडी ला योगेश का ग म्हणते..."

अचानक आलेल्या गुगली ने काय बोलणार? पटकन मग सुजाता म्हणाली ..."ते त्याचं नाव आहे म्हणून....जस तुला नावाने हाक मारते...तसंच..."

तर लगेच म्हणे...."आज पासून तू बबुडी ला...योगेश नाही म्हणायचे...तू त्याला...नाथ...म्हणायचं...नाथ...समजलं?"

हे मला काही झेपलं नाही...म्हणून मी आपलं म्हणालो ...."काय?...हे काय नवीन..."

तुला कस कळत नाही रे...असा चेहरा करत...."अरे बाबू ...सीता माईं सारख रे...ते नाही का प्रभू श्रीरामांना नाथ वाचवा...वाचवा...अस म्हणतात...तस आऊ ने आता तुला नाथ म्हणायचं..."😂😂😂🤣🤣

तसं आमची ट्यूब पेटली हे गोष्ट सांगताना आम्हीच सांगितलं आहे 🙈🙊😂😂😂

21 November 2019

वाढीव !!

Edit Posted by with No comments

सध्या पर्णवी ला सकाळी शाळेत सोडावं लागतं.जाताना मग आमचं रोज गप्पाष्टक सुरू असत.रोज नवीन काहीतरी विषय असतो.

आज सकाळी आम्ही जात होतो तेव्हा गप्पा सुरू असताना पर्णवी ने अचानक विचारलं....

"बाबू...रस्ता कशासाठी असतो?"

मी आपलं अगदी सिरीयस होऊन...सोपं करून सांगू लागलो

"रस्ता आपल्याला ये जा करण्यासाठी असतो...म्हणजे बघ आता आपल्याला घरापासून स्कुल ला जायचं आहे...कस जाणार? त्यासाठी रस्ता हवा..."

"अच्छा ...मग स्कुल कशासाठी असते?"

"स्कुल आपल्याला शिकण्यासाठी असतं"

"अच्छा...."
असंच मग अजून हे कशासाठी ,ते कशासाठी अश्या दोन तीन गोष्टी विचारल्या तेव्हा मग लक्षात आलं मातेच्या डोक्यात काही तरी खिचडी पकते आहे.अन असा विचार करे पर्यंत लगेचच गुगली आलाच.

"बाबू...मग आता सांग आईस्क्रीम कशासाठी असते?"

मी म्हणलं..."खाण्यासाठी..."

"हो की नाही...अरे बाबू ...आपण तर किती दिवस झाले आईस्क्रीम च खाल्लं नाही."

मग माझ्या लक्षात आता पर्यंत ची खिचडी का पकवली होती ते 😉

हम भी कुछ कम नहीं....यावर शक्य तितकं निर्विकार राहून कोणतीच प्रतिक्रिया नाही दिली...अन अगदी नकळत विषय गणपती बाप्पा वर नेऊन टेकवला 😂😂😂

शेवटी #बाप_है_हम

19 November 2019

टोचणी 😀

Edit Posted by with No comments
सकाळी ऑफिसला निघालो, गाडीवर बसल्यावर लक्षात काहीतरी टोचत आहे. तेव्हा वाटलं गाडीच्या सीटचा काही तरी प्रॉब्लेम आहे. 

तसाच ऑफिसात पोहचलो तर डेस्कवर बसल्यावर पण स टोचणी... तेव्हा पण वाटलं ऑफिसच्या खुर्ची मध्ये काहीतरी गडबड आहे.

संपूर्ण दिवस जिकडे जाईल तिथं बसलो की टोचणी...पण कामाच्या गडबडीत जास्त लक्ष दिलं नाही.बॅक पॉकेट ला मी बहुतांश वेळा किंबहुना कधीच काही ठेवत नाही त्यामुळे पॉकेट मध्ये काही असेल अस वाटलंच नाही.

शेवटी संध्याकाळी विचार केला सगळ्याच ठिकाणी सीट कशा काय खराब असतील.आपल्याकडेच काहीतरी गडबड असणार म्हणून सहजच बॅक पॉकेट मध्ये पाहिलं तर लेकीच्या क्लिप निघाल्या.🤣🤣🤣😂😂😂😂

मग ट्यूब पेटली दोन दिवसांपूर्वी बाहेर गेलो होतो तेव्हा पर्णवी ने मस्ती करताना पॉकेट मध्ये क्लिप टाकल्या होत्या.अन नंतर मी पण विसरून गेलो होतो.हल्ली असंच आहे बांगडी,क्लिप वगैरे वगैरे सापडत असतं 🙊🙈

#टोचलेल्या_बाबाची_कहाणी 

18 November 2019

कांदे बटाटे 😂

Edit Posted by with No comments
आत्ता रात्री जेवणाच्या वेळी सुजाता ने काकडी धुवून स्वच्छ करून ठेवली होती पण नेमकं जेवण करायला बसताना तिच्या लक्षात राहिलं नाही अन काकडी घ्यायची राहून गेलं.

जेवण झाल्यावर मग किचन आवरताना सुजातच्या लक्षात आलं की आपण काकडी धुवून ठेवली होती मात्र कापून घ्यायला विसरलो आहोत.

सहजच सुजाता पर्णवी ला म्हणाली..."पर्णवी...अग बघ जेवताना काकडी कापून घ्यायचीच विसरलो...ती धुतलेली काकडी तशीच राहिली."

तर यावर उत्तर आलं...."अग आऊ ....या माझ्या डोक्यात ना कांदे बटाटे भरले आहेत..."

सुजाताला काही समजलं नाही...म्हणून मग तिने परत विचारलं..."काय...कसले कांदे बटाटे??...काय म्हणते आहेस"

"अग हे माझं डोकं आहे ना...यात कांदे बटाटे भरले आहेत...त्यामुळे न आता मला लक्षातच काही राहत नाहीये"😂😂🤣🤣🤣🤣

ह्या वाक्याबरोबर हास्यकल्लोळ झाला...यातून सावरे पर्यंत लगेच पुढचा आदेश आला...

"आता राहू दे...काही कापत बसू नको...मी तशीच काकडी खाऊन टाकते..."अस म्हणतं काकडी गट्टम पण झाली.

जेवणानंतर पण खाण्याचा हा वारसा कुठून आला असावा हे.सां.न.ला.🙈🙊😂😂🤣🤣


16 November 2019

मला सहन होत नाही!!

Edit Posted by with No comments
दोनेक आठवड्यापूर्वी विकांताला आज नाश्ताला घरी नको बनवायला बाहेरून काही तरी आणू अस सुजाताचं अन माझं बोलणं सुरू होतं.बाहेरून नाश्ता म्हणलं की डोसा हा चिकूचा पर्यायाने आमचा फिक्स आयटम असतो.
बाबांना काय हवंय म्हणुन मी त्यांना विचारत होत. तर बाबा म्हणाले मला नको काही आणू...बाहेरचं मला काही सहन होत नाही...बाहेरच्या खाण्याचा मला त्रास होतो त्यामुळे तुमच्या पुरतं आणा. बाजूलाच पर्णवी पण होती...बाबा नको म्हणाल्यावर लगेच इमोशनल ब्लॅकमेल सुरू आजोबी अस करणार ना तुम्ही? थोडंस खा की....अगदी छोटू...जास्त नको...वगैरे...वगैरे...
शेवटी मीच म्हणालो "चिकू...नको बच्चा...आजोबांना सहन होत नाही त्यामुळे आग्रह नको करू."
आता हे अगदी नेहमी सारखंच आपलं बोलणं पण हे आपल्या साठी....हे बोलणं भविष्यात आपल्याला अंगलट येऊ शकत याची अस्मादिकांना यत्किंचितही कल्पना नव्हती.
त्यांनतर मग साधारण आठेक दिवसांनी रात्री आम्ही जेवण करत होतो.पर्णवी ने संध्याकाळी थोडं फार खाल्लं होत त्यामुळे तिला काही भूक नव्हती. पण रात्री भूक लागेल म्हणून बाबा तिला म्हणाले..."पर्णवी....तस झोपू नको...थोडंस डाळ भात खा"
तर यावर लगेच प्रत्युत्तर आलं..."नको आजोबा...मला सहन होत नाही.." हे ऐकल्यावर आम्ही ओळखलं काही तरी गडबड आहे 😂😂😂
मग मी म्हणालो..." काय...सहन होत नाही म्हणजे?"
तर मानेला झटका देत एवढं पण याला समजत नाही असा तिरकस कटाक्ष टाकत म्हणे..."अरे बाबू...आजोबांना कसं बाहेरचं म्हणजे डोसा,पावभाजी,वडा पाव सहन होत नाही नं तसच मला डाळ भात अन पोळी भाजी सहन होत नाही" 😂😂🤣🤣🤣

बालदिन !!

Edit Posted by with No comments
लेकीच्या शाळेत आज बालदिनानिमित्त नाईट आउट आहे.मागील आठवडाभर फुल ऑन excited होती. रोज चार वेळा ऐकवून व्हायचं.दिवस मोजायच काम सुरू होतं.

काल शाळेला सोडताना मला म्हणे ....बाबू तुमचं असायचं का रे नाईट आउट?

मनात म्हणलं कसलं आलंय डोंबलाच नाईट आउट...आमच्या काळी अस काही नव्हतं 🙈🙊

म्हणलं.... नाय रे बच्चा....आमच्या शाळेत नव्हतं अस काही.

तर म्हणे.... काय ? तुमच्या शाळेत नव्हतं अस काही... मग काय असायचं ?

बोलण्याच्या टोन वरून लक्षात आलं....हिला काय वाटत आहे ते 🤣🤣🤣

असो...पण मज्जा आहे लेकरांची....शाळेत मस्त पैकी डिनर, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी.
कालानुरूप भरपूर काही बदलत चाललं आहे....शाळेतील मजा मस्ती ची व्याख्या पण बदलली आहे.