08 April 2023

परीक्षेचा ताप !!

Edit Posted by with No comments
पुढच्या वर्षी पर्णवी तिसरी मध्ये जाईल.सध्या दुसरीची तोंडी परीक्षा झाल्यात अन लेखी परीक्षा सुरू आहे.सराव साठी शाळेतून सराव प्रश्न दिले आहेत त्यामुळे सुजाता अन पर्णवी अस दोघांचं धुमशान सुरु आहे.

त्यातच आता शाळेतून तिसऱ्या इयत्तेसाठी अर्ज भरून घेणं वगैरे सुरू झालं आहे.दोन दिवसांपूर्वी पर्णवी आत्याकडे अभ्यासासाठी गेली होती. तेव्हा सहजच ताई तिला म्हणाली
"पर्णवी...आता तिसरी पासून प्रश्नपत्रिका अन उत्तरपत्रिका अस वेगवेगळ्या मिळणार.आता सारखं एकंच नसणार बरं..."

ताई च बोलणं पूर्ण होतंय तोवर लगेचचं पर्णवी म्हणे...
"अरे कशाला असं करत आहेत...मग माझं काही खरं नाही बघ ,आत्तु...माझा पेपर होऊन मी घरी येते नाही तोच लगेच तुम्ही सगळे सुरू कराल ...हं... सांग बरं याचं उत्तर काय...हे काय लिहलं....हे चुकलं ...हे बरोबर... कशाला हवंय हे..."

"हो काय...मग आता..."इति ताई

"मला काय वाटतं माहित्ये का आत्तु...मी तर आता मग दुसरी मध्ये च राहते...तिसरीला जायलाच नको....किंवा मग काय करायला हवं माहित्ये का...उत्तरपत्रिका घ्यायलाच नको....वैतागच आहे नाही का "🤣🤣🤣🤣🤣

खर तर पालकत्व निभावून नेणं फार कठीण आहे. तसं पाहिलं तर ही फार लहान गोष्ट आहे पण मुलांच्या संगोपनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. परीक्षेवरून आल्यावर त्याबाबत विचारणं हे पिढ्यानपिढ्या चालतं आलेलं आहे नकळतपणे ते प्रत्येक पालक हेच करतो.पण जेव्हा आपण मुलांच्या मानसिकेतून पाहिलं तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे.पालक म्हणून विचार करायला हवाय.


0 Comments:

Post a Comment