मला 12-13 वर्ष पुण्यात राहून पण बोलण्यात असणारा गावाकडचा लहेजा काही बदललेला नाही.बोलण्यात तो पुणेरी पणा अजून काही आत्मसात झाला नाही.
तर त्याच झालं अस...दोन आठवड्यापूर्वी पर्णवी ला डान्स प्रॅक्टिस नंतर घरी घेऊन येत होतो.येताना डोसा खायचा हट्ट झाला म्हणून मग शाळेजवळ असलेल्या हॉटेल मध्ये आम्ही गेलो. ऑर्डर यायला वेळ होता त्यामुळे आमची मस्ती चालू होती.पर्णवी ला चांगलीच भूक लागली होती त्यामुळे केव्हा येणार हे टूमक चालू होत.साधारण दहा पंधरा मिनिटात उत्तप्पा आला.ऑर्डर आल्या बरोबर अधाशा सारखं पर्णवी खाण्याची घाई करू लागली म्हणून मी तिला म्हणालो...."पर्णवी....जरा हळू....उत्तप्पा गरम आसन...जरा हळू".
यावर लेकीची प्रतिक्रिया...
"बाबा...आसन काय....कसा बोलतो आहेस...अस बोलायचं नाही...उत्तप्पा गरम असेन ...अस बोल"
आता यावर पामर काय बोलणार...अजून वयाची चार वर्ष पूर्ण व्हायची आहेत तोच शुद्ध मराठी चे धडे मिळत आहेत...कॉलेजमध्ये जाईल तोवर काय काय होईल ते देवाक ठाऊक.
0 Comments:
Post a Comment