आत्ता रात्री जेवणाच्या वेळी सुजाता ने काकडी धुवून स्वच्छ करून ठेवली होती पण नेमकं जेवण करायला बसताना तिच्या लक्षात राहिलं नाही अन काकडी घ्यायची राहून गेलं.
जेवण झाल्यावर मग किचन आवरताना सुजातच्या लक्षात आलं की आपण काकडी धुवून ठेवली होती मात्र कापून घ्यायला विसरलो आहोत.
सहजच सुजाता पर्णवी ला म्हणाली..."पर्णवी...अग बघ जेवताना काकडी कापून घ्यायचीच विसरलो...ती धुतलेली काकडी तशीच राहिली."
तर यावर उत्तर आलं...."अग आऊ ....या माझ्या डोक्यात ना कांदे बटाटे भरले आहेत..."
सुजाताला काही समजलं नाही...म्हणून मग तिने परत विचारलं..."काय...कसले कांदे बटाटे??...काय म्हणते आहेस"
"अग हे माझं डोकं आहे ना...यात कांदे बटाटे भरले आहेत...त्यामुळे न आता मला लक्षातच काही राहत नाहीये"😂😂🤣🤣🤣🤣
ह्या वाक्याबरोबर हास्यकल्लोळ झाला...यातून सावरे पर्यंत लगेच पुढचा आदेश आला...
"आता राहू दे...काही कापत बसू नको...मी तशीच काकडी खाऊन टाकते..."अस म्हणतं काकडी गट्टम पण झाली.
जेवणानंतर पण खाण्याचा हा वारसा कुठून आला असावा हे.सां.न.ला.🙈🙊😂😂🤣🤣
0 Comments:
Post a Comment