दिवाळी दरम्यान लग्न मुहूर्त अन असच बोलणं चालू होत त्या वेळी बोलताना तुळशीच लग्न झालं की मग लग्न होणार अस पर्णवी च्या कानावर पडलं. मग परत सुप्त असलेला हा विषय पुन्हा उफाळून आला,अन मग आम्हाला पुन्हा आपला नेहमीचा प्रश्न पडला...."माझं लग्न कधी होणार?" 😂😂😂
अखेरीस सुजाता ने कंटाळून तिला सांगितल की..."आपल्या कडे तुळशीचं लग्न झालं की मग त्यानंतर मग लगेच तुझ लग्न..." 🤣🤣🤣
त्यामुळे मग माय आमचं वादळ भलतंच खुश झालं.त्या दरम्यान जिजाऊ मालिकेत सुद्धा जिजाऊ माँ साहेबांच्या लग्नाची बोलणी वगैरे सुरू होत ते पाहून मग काय मी घरी गेलो तेव्हा लगेच आदेश आला...
"बाबू....ए....बाबी....मला किनई लग्नात जिजाऊ माँ साहेबांसारख्या 100 साड्या हव्यात....शंभर...समजलं का"
दर एक दोन दिवसांनंतर मग आठवण करून दिली जायची तुळशीचं लग्न झालं की माझं लग्न आहे.
यथावकाश मग आम्ही तुळशीचं लग्न तेव्हा कार्यकर्ते अगदी जोरात होते...गडबडीत पूजेच्या ताटाला धक्का लागला अन सर्व सांडलं ....कोणी बोललं नाही तर आपल चुकलं आहे हे लक्षात आलं होत त्यामुळे एकदम तोंड बारीक झालं होत पण गाडी आली लगेच ट्रॅक वर कारण लग्ना वेळी अंतरपाट धरण्याचा मान मिळाला.
तुळशीचं लग्न झालं त्यानंतर लगेच प्रश्न आला...."आता माझं लग्न केव्हा करणार....ये अरे बाबू...सांग की..."
सारख विचारणं नको म्हणून मग पर्णवी ला समजून सांगितलं तर त्यावर आपलं नेहमीचं उत्तर आलं....
"नकाच करू माझं लग्न....आऊच अन तुझं लग्न झालं...आजी आजोबांचं लग्न झालं...आत्तु मामांच लग्न झालं...सगळे सगळे लग्न करतात... माझं च लग्न कोणी करत नाही...."😂😂🤣🤣🤣
"बाबू अस करणार ना तू....कट्टी तुझ्या शी आता...मी नाही बोलणार "🙊🤣🤣😂😂😂
काय करावं बर बाबाने 😉
0 Comments:
Post a Comment