दोनेक आठवड्यापूर्वी पर्णवी मातेने कौल दिला की आज आऊ चा टर्न आहे तर आज आऊनेच आंघोळ घालायची.मग सुजाता अन पर्णवी असा आंघोळी चा साग्रसंगीत कार्यक्रम सुरू झाला.त्यादिवशी मात्र बौद्धिक दिवस असावा.सुजाताला म्हणे...
"आऊ ,तुला माहिती आहे का एक असतं Good अन एक असतं Bad...."
"हो का....बरं मग त्याच काय..."
"अन आपल्या ला दोन कान आहेत की नाही.....जेव्हा Bad काही येतं ना तेव्हा आपण काय करायचं...ह्या कानातून घ्यायचं अन अस सरळ एकदम दुसऱ्या कानातून बाहेर काढायच....कारण का तर ते Bad आहे.....अन जे Good आहे ना ते कानातून अस heart पर्यंत घेऊन जायचं....म्हणजे आपण सगळं Good जे आहे तेच घेतो..."
कधी कधी निरागसतेतून आलेले बोल आपल्याला खूप मोठा अर्थ सांगून जातात. 😍😇
0 Comments:
Post a Comment