आज आई अन बाबा दोघांचा पण एकादशी चा उपवास होता त्यामुळे सकाळ पासुनच पर्णवीच आजी कडे लाडी गोडी प्रकरण सुरू होतं... आजी आज काय काय करणार ग? खिचडी करणार आहेस ना...मला पण देणार ना...नक्की ना...बरोबर आपली सेटिंग लावायचं काम सुरू होतं.
सकाळी फराळाला खिचडी झाली त्यामुळे रात्री उपवासाच तळण सुरू होत.तेव्हा पर्णवी आली अन त्यानंतर आजी सोबतच गप्पाष्टक..
"आजी...हे काय आहे ग?"
"हे ना...बटाट्याचा किस आहे..."
"तू स्वतः बनवला आहेस हा?"
"हो....मीच बनवला आहे..."
"कसा बनवलास ग आजी ?"
"अग अगदी सोपं आहे...बटाटे घ्यायचे स्वच्छ करायचे...उकडून घ्यायचे अन किस करायचा अन मग उन्हात वाळवायचा..."
अन हे सगळं ऐकल्यावर क्षणाचाही विलंब न लावता उत्स्फूर्त अशी टोन मध्ये प्रतिक्रिया आली...
"आजी अग तू आहे म्हणून माझं बर आहे, नाही तर माझं फार नुसकान [ आम्ही नुकसान ला नुसकान म्हणतो 🤣🤣🤣] झालं असतं.... मला कोणी अस छान खायला दिल असत..."
अवघ्या पाच वर्षांत आम्हाला नुकसान वगैरे समजायला लागलं आहे... बोला 😂😂😂😂
0 Comments:
Post a Comment