बहुतांश वेळा दुपारी खेळण्याची वेळ ठरलेली त्यामुळे आज दुपारी शाळा,जेवणं अस सगळं आवरून वगैरे दोन्ही वादळ ताईच्या घरी गेले.जरा वेळ दंगा मस्ती झाली ,गोष्टी अस झालं अन संध्याकाळी रिवाजाप्रमाणे भूक लागली तर लगेच पर्णवी म्हणे..
"आत्तु, भूक लागली आहे काही तरी खायला दे..."
तर ताई म्हणाली..."भूक लागली आहे काय...चला बरं खाली जाऊ ,आत्ता सगळं जेवण तयार आहे...लवकरच जेवणं करून घ्या..."
यावर पर्णवी मातेचं प्रत्युत्तर आलं...." सारखं सारखं काय ग लगेच खाली जायचं...आत्ताच तर आम्ही खेळायला आलोय...असंच करता तुम्ही... वर खेळायला आलो की लगेच आम्हाला खाली घेऊन जाता..."
असा राग दरबारी सुरू झाला तेच भाचेपंतांनी तोच सूर आळवला अन एक पाऊल पुढे जात म्हणाला..." दीदी, आपण ना एक दिवस काय करू या न यांना सगळ्यांना खाली ठेवू अन आपण दोघेचं वरती थांबू या...आपण बिलकुल पण खाली जायचं नाही.... दिवसभर इकडेच खेळू या...राहू दे या सर्वांना खाली..."
आता समोरून एवढी धुवांधार फटकेबाजी झाल्यावर आम्ही माघार कशी घेणार, पर्णवी मातेने लगेच टोलेजंग फटका टाकला... "हो रे अद्वय , त्याशिवाय यांना आपलं दुःख कळणार नाही..." 🤣🤣🤣😂😂😂😂
घ्या आपलं वय काय अन आपण केवढी टोलेजंग फटकेबाजी करावी 😂😂😂😂
0 Comments:
Post a Comment