करोना मुळे यावर्षी सुद्धा आई ला रक्षाबंधन साठी मामा कडे गावी जाणं शक्य होणार नव्हतं त्यामुळे आपण राख्या पोस्टाने पाठवून देऊ असं ठरलं. सध्याच्या डिजिटल गोष्टींमुळे पोस्ट,पत्र ,तार इ.इ. जी जुनी संपर्क संसाधने आहेत ही या नव्या पिढीला काही माहित नाहीत. पर्णवी ला पोस्ट ऑफिस , पत्र , पोस्टमन याबद्दल सांगितलं होत.
चार दिवस अगोदर राखी पाठवून पण मामा ला रक्षाबंधन ला राखी काही मिळाली नाही. आई मग त्यावरून दोन तीन वेळा म्हणाली , राखी कशी काय मिळाली नसेल, काय झालं असावं बरं ? पत्ता वगैरे तर बरोबर टाकला होता ना कि हरवल्या असाव्यात असं बरच काही बोलणं सुरु होत. आमचं हे बोलणं सुरु असताना पर्णवी जवळच खेळत बसली होती. खेळता खेळता अचानक म्हणे,
" अगं आजी ... रक्षाबंधन होत ना मग पोस्ट ऑफिसला पण सुट्टी असेल ना ?"
" ते पोस्टमन काकांना पण राखी बांधायला त्यांच्या ताई कडे जायचं असेल ना ?"
" अन आता तुला कस वाईट वाटत आहे तसच जर पोस्टमन काका गेले नाही तर त्यांच्या बहिणीला पण वाईट वाटेल ना ?"
" आता ते राखी बांधून आले ना कि मग मामा आजोबांना राख्या मिळतील"
इतक लहान लहान गोष्टीं मध्ये सुद्धा असा विचार करणाऱ्या पर्णवी ला बघून मला मस्त वाटलं 😊
0 Comments:
Post a Comment