पर्णवी कधी कधी अचानकपणे असं काही तरी बोलते किंवा वागते की आपसूकच अंतर्मुख व्हायला होतं.मग उमगत की मोठं झालो खरं पण त्यासोबत जगण्यातील सहजपणा , संवेदनशीलता ,सजगता हे मात्र हरवून गेलंय. असंच काहीसं मागच्या आठवड्यात झालं.
बऱ्याच दिवसांनी मित्र सहकुटूंब आला होता.त्याला घेऊन ताई कडे गेलो . तिथेआमच्या गप्पा अन चिल्लर कंपनीची मस्ती सुरू होती.अस सगळं गोंधळ गडबड सुरू होती अन नेमकं त्याच वेळेस ताई कडे कामाला येणाऱ्या मावशी आल्या.त्यांना काय काय करायचं हे सांगून ताई थोड्या वेळात परत आली.
ताई या मावशीना रोज कामाला आल्या की कॉफी देते.हे पर्णवी ने खूप वेळा पाहिलेलं आहे त्यामुळे तिला हे अगदी पक्क लक्षात आहे. ताई जेव्हा परत आली तेव्हा गडबडीत असल्याने मावशींना आज कॉफी च काही विचारलं नाही अन हे पर्णवी च्या बरोबर लक्षात आलं. खेळण्यात इतके दंग होते तरी ते सगळं बाजूला ठेवून आली अन ताई ला म्हणे...
"आत्तु... अग आज तर तू मावशींना कॉफी दिलीच नाही....आता काम झालं तर त्या तश्याच जातील.."
"अरे हो ...अग इतकी गडबड सुरू आहे ना त्यामुळे राहूनच गेलं...देते बरं..." इति ताई
" मग त्यांना सांगतेस का तू कॉफी पिल्याशिवाय जाऊ नका म्हणून..." पर्णवी
"हो...ठीक आहे...देते हं..." ताई
"नाही तर असं करू या का... तुझी गडबड आहे तर मला दूध,कॉफी अन साखर मिक्स करून दे मी कॉफी बनवते.."😃
अखेरीस ताई ने जेव्हा मावशींना कॉफी दिली त्यानंतरच पर्णवी खेळायला गेली.🤗
तस पाहिलं तर अगदी लहानशी गोष्ट पण दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर नकळत अंतर्मुख करायला लावणारी ☺️
0 Comments:
Post a Comment